Wednesday, 26 October 2016

मुंबई मेरी जाण


मुंबई-मुंबई म्हटल्यावर डोळ्या समोर उभ्या राहतात त्या मोठमोठ्या इमारती मोठमोठ्या गाड्या, मुंबई मेरी जण म्हणायला मला काहीच हरकत नाही कारण या मुंबईने खूप इतिहास घडवले आहेत. या मुंबई ने अनेक जणांना तरल आहे. जगातील वेगवेगळ्या लोकांची मिळून हि मुंबई बनली आहे. इथे अनेक प्रकारचे लोक राहतात.अनेक भाषा बोलणारे लोक राहतात. पण या मुंबईची एक वेगळीच गंमत आहे ती म्हणजे या मुंबईत खूप प्रमाणात मराठी मानस राहतात. तसाही मराठी माणसांची मुंबई म्हणायला काही हरकत नाही. पण दोन मराठी माणूस एका मेकाला समोर समोर भेटतात तेव्हा ते मराठी मध्ये न बोलता हिंदी मधेच बोलतात. कारण त्या दोन माणसांना हे माहित नसत कि समोरचा माणूस मराठी आहे ते हीच एक मोठी गंमत आहे. त्याच प्रमाणे या मुंबईत अनेक ठिकाण फिरण्याचा सारखी आहेत . या मुंबईत आलेला माणूस कधीच उदास बसू शकत नाही. या मुंबईत माणसाला रोजगाराच्या चांगल्या संध्या उपलब्ध आहेत या  मुंबईच्या जीवावर अनेक कुटुंब चालतात. कारण या मुंबईत खूप मोठं मोठ्या कंपन्या आहेत  त्या कंपन्यानं मध्ये रोजगाराची संधी मिळते. त्याच प्रमाणे या मुंबईत चांगल्या प्रकारे शिक्षण देखील दिले जाते. इथला अनपढ माणूस सुद्धा चांगल्या प्रकारे वाचू किंवा लिहू शकतो. म्हणून हि मुंबई सगळ्यांना आवडते. म्हणून या मुंबईला मुंबई मेरी जाण असा म्हणणे काहीच वावगं ठरणार नाही.  

न्यूज पेपर चा वाढता बाजार

बातमी पत्र हे संवादाचे चांगले मध्यम समजले जाते. जगातील वेगवेगळ्या घडामोडी लोकांना न्यूज पेपर च्या माध्यमातून कळते. रोजच्या आपल्या धकाधकीच्या जीवनात काय काय घडत आहेत हे आपल्याला न्यूज पेपरच्या माध्यमातून कळते. पण आजकाल न्यूज पेपर हे वाचण्या सारखे राहले नाही आहेत. कारण न्यूज पेपर मध्ये ज्या गोष्टी देयला पाहिजेत त्या दिल्याच जात नाही आहेत. आजकालच्या न्यूज पेपर मध्ये जे लोकाना वाचायचे आहे त्या गोष्टी दिल्याच जात नाही आहेत. पहिले जे न्यूज पेपर निघायचे त्या मध्ये  लहान मुलां पासून ते वृद्ध व्यक्ती पर्यंत सगळ्यांना वाचता येतील अशे पेपर असायचे. सगळ्या लोकाना पेपर वाचावयास आवडतील असा मजकूर आधीच्या न्यूज पेपर मध्ये असायचा. पण आज काळाच्या न्यूज पेपर मध्ये तसा काही दिसत नाही.


आजकालच्या न्यूज पेपर मध्ये मोठ्या प्रमाणात जाहिराती दिसून येतात. न्यूज पेपर मध्ये बातम्या किवा एखाद्या विषयाची माहिती कमी पण जाहिराती जास्त. आता मला एक गोस्त अजिबात समाजात नाही आहे कि आपण वाचावयास घेतलेले वृतपत्र हे नक्की वृतपत्र आहे कि जाहिरात पत्र. जर मग तुम्हाला न्यूज पेपर मध्ये जास्तीत जास्त जाहिराती देत असाल तर मग त्यासाठी तुम्ही वेगळा जाहिरात पत्र असे वृत्त सुरु का नाही करत. त्यातल्या त्यात राजकारणी लोकांचे पण खूप वाढदिवसाची माहिती दिलेली असते. मान्य आहे कि बहुतेजाशे पेपर हे राजकीय पक्षाचे आहेत. म्हणून काय त्यांचे फक्त वाढदिवस आणि जास्तीत जास्त जाहिरातीच द्याव्या. जर अशा प्रकारे तुम्ही न्यूज पेपर काढलात मग लोकांनी नक्की वाचव काय. हा मोठा प्रश्न लोकांसमोर उभा होतो. 

नटसम्राट नाटक-समीक्षण

नटसम्राट हे नाटक एका कलाकाराची व्यथा सांगणारा नाटक आहे. या नाटका मध्ये श्रीराम लागू(कुसुमाग्रज) यांची व्यथा मांडलेली आहे. नटसम्राट हि  वी.वा. शिरवाड करांची कादंबरी आहे. या नाटकातील नटसम्राटाची भूमिका अनेक वर्ष श्रीराम लागू यांनी केली आहे. या नटसम्राट नाटकात श्रीराम लागू नंतर अनेक जणांनी नटसम्राटाची भूमिका केली.त्यामध्ये सतीश दुभाती,वूपेन्द्र दाते,यशवंत दत्त,चंद्रकांत घोखले,दत्ता भट,मधुसुधन कोलटकर,राजा गोसावी,गिरीश देशपांडे आणि त्याच बरोबर बॉलीवूड चे मराठी कलाकार नाना पाटेकर यांनी देखील नटसम्राटाची भूमिका केली आहे. या नाटकाला रंगभूमीवर येवून अनेक वर्ष झाली. तरीही आजपण हे नाटक बघताना डोळ्यात पाणी येते. हे नाटक करणे साधी सुधी गोष्ट नाही आहे. या नाटकामध्ये नटसम्राटाची भूमिका करण्यासाठी मानसिक दृष्ट्या चांगला असावा लागतो. कारण या नाटकातील   नटसम्राटाची भूमिका बजावताना अनेक कलाकारांना थकवा जाणवतो. 


या नाटकाचा दि गोवा हिंदू असोशियेषण कला विभाग या संस्थेने २३डीसेम्बर , इ.स. १९७० ला बिर्ला मातोश्री सभागृह मुंबई  इथे सादर करण्यात आला. या नाटकामध्ये एका वृद्ध व्यक्तीची कथा मांडलेली आहे. एखादा माणूस म्हातारा झाल्यावर त्याला कोणत्या कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते हे या नाटकात मांडलेले आहे. या नाटकातील नटसम्राट आपल्या जीवनात कमावलेली सगळी संपती मुलांच्या नावावर करून कसा फसतो हे या नाटकाच्या माध्यमातून मांडलेली आहे. पैसा असताना आपल्या जवळ सगळी जन असतात पण पैसा एकदा आपण आपल्या मुलांच्या स्वाधीन केल्या नंतर आपल्याला कशा प्रकारे लांब करतात हे या नाटकातून सांगितलेले आहे. त्यानंतर आपली संपत्ती मुलांच्या नावे करून तीच मुल आपल्याला आपल्याच घराच्या बाहेर काडतात. त्याचबरोबर पोरगी कशाप्रकारे चोरीचा आरोप घेवून स्वत पासून दूर करते. हे या नाटकाच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे. जेव्हा आपल्याच माणसांपासून दूर होवून पुढची जिंदगी कशा प्रकारे जगली जाते हे या नाटकातून सांगण्यात आलेली आहे 

Tuesday, 25 October 2016

चला हवा येऊ दया-समीक्षण

चला हवा येऊ दया हा  एक कॉमेडी कार्यक्रम आहे. त्याच्यातून लोकांना मोठ्या प्रमाणात हसण्यात येत. हा कार्यक्रम महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध आहे. कारण या कार्यक्रमातील जे कलाकार आहेत ते अगदी चांगल्या प्रकारे आपली भूमिका बजावत असतात. त्यामुळे हा कार्यक्रम सगळ्यांना आवडतो. त्याच बरोबर या कार्यक्रमात नवनवीन कलाकार आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी येतात. त्यामुळे लोकांना तो कार्यक्रम बघण्याची उत्सुकता लागून राहते. बाहेरच्या कलाकारांना माहित असत कि हि मालिका संपूर्ण महाराष्ट्रात पहिली जाते त्यामुळे चित्रपट निर्मात्यांना आपल्या  चित्रपटाचे प्रमोशन कराण्यासाठी चांगले माध्यम  मिळाले. त्यामुळे या कार्यक्रमाचे टी आर पी पण खूप आहे. या कार्यक्रमात सूत्रसंचालन चा काम निलेश साबळे करतो. त्याच प्रमाणे भालचंद्र कदम (भाऊ कदम ),कुशल बद्रिके , भारत गणेशपुरे ,सागर कारंडे ,श्रेया बुगडे ,विनीत बोन्डे हे कॉमेडी करण्याचं  काम करत असतात.


या कार्यक्रमामध्ये मराठी चित्रपट प्रमाणे हिंदी चित्रपटांचे प्रमोशन  केले जाते. त्यामुळे लोकांना हा कार्यक्रम खूप व मोट्या प्रमाणात आवडतो. त्याचप्रमाणे या मालिकेने महाराष्ट्र दौरा काढून लोकांच्या भेटीला जाऊन त्यांना अनेक प्रकारे मदत करून आपल्या मालिकेचे नाव महारष्ट्राच्या मनात कोरण्याचा प्रयत्न केला आहे . त्याचप्रकारे या मालिकेच्या माध्यमातून एखाद्या अभिनयाच्या माध्यमातून लोकांना चांगला संदेश दिला जातो. आणि वेगवेगळ्या व्यक्तींना बोलावून त्यांच्याशी गप्पा केल्या जातात. 
हा कार्यक्रम झी मराठी ऑर्गनायज करते. हा कार्यक्रम १८ऑगस्ट २०१४ ला चालू झाला. या कार्यक्रमाचे लिखाण,दिगदर्शन आणि सादर करता निलेश साबळे आहे. म्हणूनच हि मालिका सगळ्यांना आवडते . 

फेसबुक

फेसबुक हि सोशिअल साईट आहे. आणि संवाद साधण्याचं मोठं माध्यम आहे. या माध्यमातून आपण अनेक नवीन मित्र बनवू शकतो आणि त्यांच्याशी आपण बोलू पण शकतो. या मध्ये आपण अनेक प्रकारची माहिती इतरांना पाठवू शकतो . त्यामधून आपण अनेक माहिती मिळवू शकतो. पण जेवढे या फेसबुक चे चांगले फायदे आहेत तेवढे त्याचे वाईट कारण पण आहेत. एकतर आपण हे माध्यम वापरल्या मुले आपला वेळ व पैसा या दोन्ही गोष्टी वाया जातात.
 
त्या नंतर आपण ज्या मित्राजवळ बोलत असतो तो मित्र तोच सुद्धा असू शकत नाही. कारण फेसबुक वर खूप जनांचे वेगळ्या नावाने किंवा मुलीच्या नावाने अकाउंट उघडलेले असतात . त्याला इंग्लिश मध्ये फेक अकाउंट असे म्हणतात. या फेक अकाउंट च्या माध्यमातून कोणत्याही मुलाची अथवा मुलीची फसवणूक होवू शकते. यात जास्तीत जास्त मुलांचे फेक अकाउंट असतात. आणि या मध्ये मुली खूप प्रमाणात फासळ्या जातात. मग यातून खूप प्रमाणात मुलीचे आत्महत्येचे प्रकार घडतात. त्यानंतर आपण जे फोटो अपलोड करतो त्या फोटोंचा दुरउपयोग केला जातो. आणि या फेसबुक च्या माध्यमातून आपण एखादी माहिती चुकीची किंवा अपमानास्पद टाकली. तर आपल्याला अटक होऊ शकते. म्हणून फेसबुक या सोशल साईट चा कामापुरतीच उपयोग करावा.   

प्रदूषण एक समस्यां

आपल्या आजू बाजूच्या परिसरात अनेक प्रकारे प्रदूषण घडत आहे आणि हे प्रदूषण मानवाकडूनच घडून येत आहे.काही माणसांना याची जाणीव आहे व काही माणसांना याची जाणीव देखील नाही आहे. जर आपण अशा प्रकारे प्रदूषण करत राहिलो तर एक दिवस हि मानवी जीवन सृष्टी धोक्यात येईल. कारण आपल्याकडून अनेक माध्यमातून प्रदूषण घडत आहे. आणि या प्रदूषणाला करणीभूत पण आपणच आहोत . आपल्याला प्रदूषण कमी करता आलं पाहिजे. आपल्याकडून नकळत प्रदूषण घडत असत. त्यामध्ये  ध्वनी प्रदूषण,हवा प्रदूषण,पाणी प्रदूषण. अशे अनेक प्रदूषण होत असतात.
 
हे प्रदूषण आपल्याला थांबवले पाहिजे. त्यासाठी आपल्याला कमीत कमी प्रदूषण कशा प्रकारे करता येतील विचार केला पाहिजे. त्यासाठी आपल्याला  हवा प्रदूषण कमी करण्यासाठी कमी धूर सोडणार्या गाड्या वापराव्या लागतील.चालत जाता येईल अशा ठिकाणी  गाडी नेवू नये . अशा ठिकाणी चालताच किंवा सायकल ने जाता आलं पाहिजे.त्यामुळे इंधन बचत पण होईल आणि हवा प्रदूषण पण होणार नाही. त्यानंतर दिवाळीत फटाके वाजवणे कमी केले पाहिजेत अथवा पूर्ण पणे बंद केले पाहिजेत त्यामुळे ध्वनी प्रदूषण पण होणार नाही आणि वायू प्रदूषण पण होणार नाही.त्यानंतर आपण जो कारखान्यातील सांडपाणी नदी किंवा समुद्रात सोडतो त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी प्रदूषण होते. नांतर तेच पाणी घरोघरी पोचते पिण्यासाठी आणि मग हेच पाणी पिऊन आपण आजारी पडतो . मग आपणच केल्याला कृत्याला आपणच बळी पडतो . आपण जर प्रत्येक गोष्टी कडे दुर्लक्ष केले तर मानवी जीवन धोक्यात येईल. म्हणून आपणच मानवी जीवन वाचवून सगळ्यांना आनंदी राहता आलं पाहिजे. 

सैराट-समीक्षण

सैराट हि मराठी चित्रपट आहे. हा चित्रपट नागराज मंजुळे यांनी काढला आहे . नागराज मंजुळे यांची हि त्यांची
दुसरा  चित्रपट पहिली चित्रपट फ्यांड्री आणि दुसरी चित्रपट सैराट . आजकाल बहुतेक चित्रपटाच्या कहाण्या ह्या प्रेमावरच असतात. कोणताही चित्रपट घेतला कि त्यात प्रेमकथा येतेच. त्याच प्रकारचा हा चित्रपट आहे. सैराट या चित्रपटाचा अर्थ अनियंत्रित किंवा मुक्त असा होतो . या चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे हे आहेत. या चित्रपटाची कहाणी नागराज मंजुळे आणि अविनाश घाडगे यांनी लिहली आहेत. त्याच बरोबर या चित्रपटाचे निर्माता नितीन केणी आणि नितीन साने हे आहेत. या चित्रपटात दोन महत्वाची भूमिका बजावणारे कलाकार आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू हे आहेत. आकाश ठोसर हा पुण्यामध्ये एम.ए करत आहे.आणि रिंकू राजगुरू हि नुकतीच नववी पास झाली आहे. या चित्रपटामध्ये एकूण चार गाणी आहेत. त्यातील "याड लागलं" "झिंगाट" हि गाणी अजय अतुल यांनी गायली आहेत. आणि "आत्ताच बया का बावरला"हे गाणं श्रेया घोसाळ यांनी गायलं आहे. "सैराट झालं जी"हे गाणं चिन्मया श्रीपादा आणि अजय गोगावले यांनी गायलं आहे. आणि हि संपूर्ण गाणी अजय-अतुल यांनी लिहली आहेत. सैराट हा भारतातील पहिला चित्रपट आहे कि ज्याची सगळी गाणी हॉलिवूड स्टुडिओ मध्ये रेकॉर्ड करण्यात आली आहेत. हा चित्रपट २९एप्रिल २०१६ ला प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाची कथा  प्रेमावर असल्यामुळे ती लोकांना प्रचंड प्रमाणात आवडली. त्याच प्रमाणे  या मध्ये असलेली गाणी हि सुपरहिट ठरली.त्यातच झिंगाट हे गाणं  तर लोकांना खूपच आवडलं. हे गाणं जगभर प्रसिद्ध झालं.


या चित्रपटात कॉलेज मधली लव्ह स्टोरी दाखवण्यात आली आहे. कॉलेज मध्ये कशा प्रकारे दोन मुला मुलीचे प्रेम एकमेकांवर बसते. आणि त्यातून निर्माण होणाऱ्या अडचणी आणि त्या अडचणींशी सामना करत घरातून पळून जाऊन केलेलं लग्न अशा प्रकारे हि कथा रेखाटण्यात आली आहे. 
याच कथेच्या आधारावर सैराट चित्रपट हा मराठी चित्रपट सृष्टीतील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला. या चित्रपटाने १०० करोड ची कमाई करून आपले नाव रसिकांच्या मनावर कोरले आहे . 

दापोली एक पर्यटन स्थळ

दापोली तालुका हा पर्यटनासाठी  खूप चांगले शहर आहे. दापोली हे शहर नररत्नांची खान म्हणून ओळखली जाते. या दापोली तालुक्याला अनेक नररत्न लाभलेली आहेत. या दापोली तालुक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नीचं गाव आहे व त्यांचं स्मारक देखील आहे. त्यानंतर,दापोली पासून १०-१२ कि मी च्या अंतरावर साने गरुजींच राहत घर आहे. त्या नंतर दापोलीतून ५-६ कि मी च्या अनंतरावर मुरुड इथे समुद्राच्या किनार्याला लागून थोर साहित्यिक महर्षी धोंडू केशव कर्वे  याचे घर आणि वस्तू संग्रहालय  आहे. त्याच प्रमाणे दापोलीतून १२ कि मी अंतरावर  चिखलगाव हे साने गुरुजींचं जन्म गाव आहे .

त्यानंतर दापोली तालुक्यात निसर्गाच्या कुशीत लपलेली अनेक पर्यटन स्थळ देखील आहेत. दापोली तालुक्याला प्रचंड मोठा असा  समुद्र किनारा लाभला आहे. या समुद्र किनाऱ्याला उन्हाळ्यात पर्यटकांची खूप ओढ असते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक या समुद्रकिनाऱ्याला भेट देतात. या दापोली तालुक्याला छत्रपती शिवाजींचा इतिहास देखील लाभला आहे . कारण या दापोली तालुक्यात समुद्राला लागून शिवाजी महाराजांचा सुवर्णदुर्ग हा किल्ला देखील आहे. त्याच बरोबर केळशी या गावात एका रात्रीत बांधलेलं शिवाजींनी बांधलेलं मंदिर देखील आहे. त्याच नाव "याकूबबा दर्गा" असे आहे. 
त्याचबरोबर दापोली तालुक्याला पाच पांडवांचे देखील पाय लागलेले आहेत. दापोलीतील पन्हाळेकाजी या गावात पांडवांनी कोरलेल्या लेण्या देखील आहेत. आणि याच गावाला लागून उन्हवरे हे गाव आहे तिथे गरम पाण्याचे कुंड आहेत.
त्याच बरोबर दापोली हे शहर देवस्थानाच्या बाबतीत पण पुढे आहे. दापोली या तालुक्यातील दाभोळ या गावात स्वयंभू चंडिका देवीचं मंदिर देखील आहे. आणि आंजर्ला या गावात ऊंच टेकडीवर गणपतीचं मंदिर आहे. त्याच बरोबर दापोलीत इंग्रजांच्या काळातील चर्च देखील आहे. त्यानांतर दापोलीत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ देखील आहे.  हे महाराष्ट्रातील  चार कृषी  विद्यापीठांपैकी हे  एक कृषी विद्यापीठ आहे. 
अशा प्रकारे दापोली हे शहर पर्यटना साठी खूप प्रसिद्ध आहे . 

Monday, 24 October 2016

बॉलिवूड

आजकाल  बॉलिवूड मधील कलाकार मोठ्या प्रमाणात करोडो रुपये कमावत आहेत. ते पण इन्कम टॅक्स न भरता हे पैसे कमावत आहेत. जर आपण एवढे करोडो पैसे बॉलिवूड वर खर्च करू शकतो. तर मग तेच पैसे आपण गरीबांनवर का खर्च करू शकत नाहीत. आपण हे पैसे अनेक प्रकारे लोकांच्या ,किंवा समाज कल्याणा साठी वापरू शकतो. ज्या महाराष्ट्रात मार्च एप्रिल च्या दरम्यान पाण्याचा दुष्काळ पडतो. त्याच महाराष्ट्रात नागराज मंजुळे सैराट सारखा चित्रपट काढून करोडो  कमावून दुष्काळ ग्रस्त लोकांना तो मदत करू शकतो. मग बॉलिवूड मधील कलाकार पण करोडो मधेच कमावत आहेत. मग त्यांनी  भारतात चित्रपट तयार करून करोडो कमावतात मग त्यांनी महाराष्ट्रातील लोकांना मदत केली तर कुठे वाया जातेय .


बॉलिवूड मधील किवा मराठी फिल्म इंडस्ट्रीतील लोकांनी जर मदत केली तर महाराष्ट्रातील अनेक प्रॉब्लेम दूर होतील. यांनी केलेल्या पैशाच्या मदतीतून आपण खूप चांगली काम करू शकतो. ज्या गावातील माणसे किंवा मुले-मुली शिक्षणापासून वंचित आहेत. किंवा त्यांना शिकण्याची इच्छा आहे पण शाळा -कॉलेज नसल्या मुले ते शिकू शकत नाही आहेत. अश्या लोकांसाठी  आपण फिल्म इंडस्ट्रीतील कलाकारांनी दिलेल्या पैशातून आपण त्यांच्या साठी शाळा कॉलेज बंधू शकतो. त्यांना शिक्षणा साठी आर्थिक दृष्ट्या मदत करू शकतो . 
त्याच प्रमाणे काही गावात प्राथमिक उपचारासाठी हॉस्पिटल नाही आहेत.त्यातूनच एखादा व्यक्ती आजारी पडला तर त्याला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी २०-३० कि.मी अंतर चालत जावे लागते. त्यातच त्या व्यक्तीची  प्रकृती खूपच गंभीर असेल तर  त्या व्यक्तीला दवाखान्यात घेऊन जाण्याआधीच मरण पावलेले असते. या गोष्टी होऊ नयेत म्हणून त्यांच्या साठी आपण त्यांच्या गावात प्राथमिक आरोग्य केंद्र बंधू शकतो . आपण जो वायफळ पैसा कुठेही करत असतो तोच पैसा समाज सेवे साठी वापरला तर कोणत्याही गावात कोणीही व्यक्ती मृतिमुखी पडणार नाही . आणि कोणी शिक्षणा पासून वंचित देखील राहणार नाही. 

काळ रात्र....

महाड हि चित्त थरारक घटना  आहे . हि घटना ऐकल्या नंतर काळजाचा ठोकाच चुकेल अशी हि घटना आहे .या महाड दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात  जीवित हानी आणि मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाली . या मध्ये वित्त हानी कडे दुर्लक्ष केला तर मात्र जीवित हानी खूपच धक्का दायक आहे .या संपुर्ण दुर्घटने मध्ये २ एस टी बस वाहून गेल्या .पण याच बस मधले २५-३० प्रवाशी बेपत्ता झाले .


हा ब्रिज १०० वर्ष जुना होता. हे सरकारला माहित असून त्यांनी विशेष दाखल घेतली नाही . नडगाव-राजेवाडी दरम्यानचा हा ब्रिटीशकालीन पूल अखेरची घटका मोजत असून, हा पूल धोकादायक बनला आहे असे वृत्त लोकमतने ३ सप्टेंबर २०१३ च्या हॅलो रायगड पुरवणीत दिले होते.तरी देखील सरकारने गोष्टीकडे दुर्लक्ष केले.जर या बातमी कडे सरकारने दुर्लक्ष केले  नसते तर तो महाड चा पूल वाहूनच नसता गेला .एकूणच काय तर या दुर्घटनेला सर्वस्वी सरकारच जबाबदार आहे .हि घटना घडल्या नंतर ९ दिवस झाले तरी वाहून गेलेल्यांचा शोध चालूच होता.म्हणजे आपला महाराष्ट्र सरकार एकूणच तंत्रज्ञानाच्या  बाबतीत किती पुढे आहे हे दिसून येते .जर महाराष्ट्र  सरकार कडे चांगली कार्य प्रणाली असती तर शोध मोहीम एवड्या दिवस चाललीच नसती .जर अमिरीकेकडे ,जपानकडे ,चीनकडे  एवड तंत्रज्ञान असू शकतो .मग भारतात का नाही .म्हणजे भारत अजून तरी प्रगतशील नाही आहे .

शेतकर्यांची आत्महत्या

शेतकरी हा शेती पिकवुन लोकांची पोट भरत असतो. ही शेती करण्यासाठी शेतकरी पतापेठी व बॅॅकाकडून कर्ज घेतो. पण दुष्काळामुळे  किंवा प्रदूषणामुळे त्याची शेती मोठ्या प्रमाणात उगवली जात नाही. पिक न येण्याला पण मानवच जबाबदार आहे. कारण मानवाच्या हल्गर्जी पानामूळे या प्रकारची अडचणी निर्माण होत आहेत  कारण मोठ्या प्रमाणात वृक्षतोड़ आणि वृक्षतोड झाल्यामुळे  पाऊस पडण्याचे प्रमाण कमी  होत. आणि या प्रकारच्या अडचणी  आल्यामुले शेती पिकत नाही. आणि ही शेती मोठ्या प्रमाणात न पिकल्यामुले आणि डोक्यावर असलेल्या कर्जा ला घाबरून तो आत्महत्या  करण्याचा विचार करतो.


पण शेतकर्यांच्या झालेल्या नुकसानीची  भरपाय जर  सरकारकडून मिळत असेल तर शेतकरी आत्महत्या  करण्याचा  विचार देखिल करणार नाही. आणि शेतकर्यांचे आत्महतेचे  प्रमाण देखिल कमी होतील. त्याच प्रमाणे वेगवेगळ्या  प्रकारे प्रयोग करुण शेतकर्यांना कमी पावसाच्या पाण्यात पिक घेता येतील अशी बियाने तयार केली पाहिजेत . तरच पाण्याच्या अभावामुळे   शेतीचे नुकसान होणार नाही. त्याच प्रमाणे शेतकर्याना सरकारकडून स्वस्त दरात शेती बियाणे दिले पाहिजे. तसेच त्यांच्या शेतीवर होणार्या रोगासाठी सरकारने तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बनवलेली  औषधे दिली पाहिजेत. जेनेकरुण शेतकरी त्याची शेती चांगल्या प्रमाणात पिकवुन तो ते धान्य विकून आपल कर्ज फेडू शकतो. आणि स्वताच्या परिवराच पोट भारू शकतो. जर अशीच सरकारने शेतकर्याला मदत केली. तर आपला शेतकरी आत्महत्या करणार नाही. 

दिवाळीचा आनंद

दिवाळी सण हा खुप मोठा आनंदाचा  सण आहे .या दिवाळीच्या निमित्ताने शाळा  काॅलेजांना सुट्टी भेटते . त्या निमित्ताने घरोघरी चांगले पदार्थ तयार केले जातात. हे पदार्थ गरीब लोकांच्या घरी बनवले जातात . त्यामुले त्यांना एक रोजगाराची नवी  संधि  उपलब्ध होते . त्याच प्रमाणे  दिवाळी मधे मोठ्या प्रमात फटाके फोडले जातात . हे फटाके फोडल्यामुळे  आपल्या आजू बाजुच्या वातावरणात प्रदुषण निर्माण होते . या प्रदूषणमुळे मानवी जीवन धोक्यात येते .

या फटाक्यांच्या पैसामध्ये आपण जर गरीब लोकांकडून फराल विकत घेतला तर आर्थिक दृष्ट्या मदत होइल . व आपल्या प्रमाणे त्यांना देखिल दिवाळी आनंदात साजरी करता येईल. जर आपण अशा प्रकारे विचार केला  तर आपण आपली दिवाळी प्रदुषणमय व आनंदीमय साजरी करू शकतो .आणि काही गोष्टी आपल्याला गरज नसताना देखिल लोकांकडून विकत घ्याव्यात कारण  " ते लोक दुसर्यांकड़े हात न पसरता स्वताच्या कष्टाने पैसे कमावू बघत असतात  " आणि आपण फटाकेच नाहीं  वाजवले तर मग चीन कडून कोणताही  माल विकत घेण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही . त्याच प्रमाणे आपण या फटाके न वाजवता व कोणतीही आतिशबाजी न करता  वाचलेल्या पैसातुन   माध्यमातून आपण बर्याच प्रकारे समाज सेवा करू शकतो . या पैसाच्या माध्यमातून आपण गरीब लोकांच्या मुलांवर आपण शिक्षणासाठी  पैसे खर्च करू  शकतो . अनाथ आश्रमात आपण ते पैसे दान करू शकतो किवा दुष्काळग्रस्थ लोकांना आपण मदत करू शकतो . अशा अनेक गोष्टी आपण करू शकतो . आणि अशा प्रकारे आपण पैसा खर्च केला तर नक्कीच आपल्या  प्रमाणे इतरांची देखिल दिवाळी चांगली साजरी होईल .