चला हवा येऊ दया हा एक कॉमेडी कार्यक्रम आहे. त्याच्यातून लोकांना मोठ्या प्रमाणात हसण्यात येत. हा कार्यक्रम महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध आहे. कारण या कार्यक्रमातील जे कलाकार आहेत ते अगदी चांगल्या प्रकारे आपली भूमिका बजावत असतात. त्यामुळे हा कार्यक्रम सगळ्यांना आवडतो. त्याच बरोबर या कार्यक्रमात नवनवीन कलाकार आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी येतात. त्यामुळे लोकांना तो कार्यक्रम बघण्याची उत्सुकता लागून राहते. बाहेरच्या कलाकारांना माहित असत कि हि मालिका संपूर्ण महाराष्ट्रात पहिली जाते त्यामुळे चित्रपट निर्मात्यांना आपल्या चित्रपटाचे प्रमोशन कराण्यासाठी चांगले माध्यम मिळाले. त्यामुळे या कार्यक्रमाचे टी आर पी पण खूप आहे. या कार्यक्रमात सूत्रसंचालन चा काम निलेश साबळे करतो. त्याच प्रमाणे भालचंद्र कदम (भाऊ कदम ),कुशल बद्रिके , भारत गणेशपुरे ,सागर कारंडे ,श्रेया बुगडे ,विनीत बोन्डे हे कॉमेडी करण्याचं काम करत असतात.
या कार्यक्रमामध्ये मराठी चित्रपट प्रमाणे हिंदी चित्रपटांचे प्रमोशन केले जाते. त्यामुळे लोकांना हा कार्यक्रम खूप व मोट्या प्रमाणात आवडतो. त्याचप्रमाणे या मालिकेने महाराष्ट्र दौरा काढून लोकांच्या भेटीला जाऊन त्यांना अनेक प्रकारे मदत करून आपल्या मालिकेचे नाव महारष्ट्राच्या मनात कोरण्याचा प्रयत्न केला आहे . त्याचप्रकारे या मालिकेच्या माध्यमातून एखाद्या अभिनयाच्या माध्यमातून लोकांना चांगला संदेश दिला जातो. आणि वेगवेगळ्या व्यक्तींना बोलावून त्यांच्याशी गप्पा केल्या जातात.
हा कार्यक्रम झी मराठी ऑर्गनायज करते. हा कार्यक्रम १८ऑगस्ट २०१४ ला चालू झाला. या कार्यक्रमाचे लिखाण,दिगदर्शन आणि सादर करता निलेश साबळे आहे. म्हणूनच हि मालिका सगळ्यांना आवडते .
No comments:
Post a Comment