दिवाळी सण हा खुप मोठा आनंदाचा सण आहे .या दिवाळीच्या निमित्ताने शाळा काॅलेजांना सुट्टी भेटते . त्या निमित्ताने घरोघरी चांगले पदार्थ तयार केले जातात. हे पदार्थ गरीब लोकांच्या घरी बनवले जातात . त्यामुले त्यांना एक रोजगाराची नवी संधि उपलब्ध होते . त्याच प्रमाणे दिवाळी मधे मोठ्या प्रमात फटाके फोडले जातात . हे फटाके फोडल्यामुळे आपल्या आजू बाजुच्या वातावरणात प्रदुषण निर्माण होते . या प्रदूषणमुळे मानवी जीवन धोक्यात येते .
या फटाक्यांच्या पैसामध्ये आपण जर गरीब लोकांकडून फराल विकत घेतला तर आर्थिक दृष्ट्या मदत होइल . व आपल्या प्रमाणे त्यांना देखिल दिवाळी आनंदात साजरी करता येईल. जर आपण अशा प्रकारे विचार केला तर आपण आपली दिवाळी प्रदुषणमय व आनंदीमय साजरी करू शकतो .आणि काही गोष्टी आपल्याला गरज नसताना देखिल लोकांकडून विकत घ्याव्यात कारण " ते लोक दुसर्यांकड़े हात न पसरता स्वताच्या कष्टाने पैसे कमावू बघत असतात " आणि आपण फटाकेच नाहीं वाजवले तर मग चीन कडून कोणताही माल विकत घेण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही . त्याच प्रमाणे आपण या फटाके न वाजवता व कोणतीही आतिशबाजी न करता वाचलेल्या पैसातुन माध्यमातून आपण बर्याच प्रकारे समाज सेवा करू शकतो . या पैसाच्या माध्यमातून आपण गरीब लोकांच्या मुलांवर आपण शिक्षणासाठी पैसे खर्च करू शकतो . अनाथ आश्रमात आपण ते पैसे दान करू शकतो किवा दुष्काळग्रस्थ लोकांना आपण मदत करू शकतो . अशा अनेक गोष्टी आपण करू शकतो . आणि अशा प्रकारे आपण पैसा खर्च केला तर नक्कीच आपल्या प्रमाणे इतरांची देखिल दिवाळी चांगली साजरी होईल .
No comments:
Post a Comment