बातमी पत्र हे संवादाचे चांगले मध्यम समजले जाते. जगातील वेगवेगळ्या घडामोडी लोकांना न्यूज पेपर च्या माध्यमातून कळते. रोजच्या आपल्या धकाधकीच्या जीवनात काय काय घडत आहेत हे आपल्याला न्यूज पेपरच्या माध्यमातून कळते. पण आजकाल न्यूज पेपर हे वाचण्या सारखे राहले नाही आहेत. कारण न्यूज पेपर मध्ये ज्या गोष्टी देयला पाहिजेत त्या दिल्याच जात नाही आहेत. आजकालच्या न्यूज पेपर मध्ये जे लोकाना वाचायचे आहे त्या गोष्टी दिल्याच जात नाही आहेत. पहिले जे न्यूज पेपर निघायचे त्या मध्ये लहान मुलां पासून ते वृद्ध व्यक्ती पर्यंत सगळ्यांना वाचता येतील अशे पेपर असायचे. सगळ्या लोकाना पेपर वाचावयास आवडतील असा मजकूर आधीच्या न्यूज पेपर मध्ये असायचा. पण आज काळाच्या न्यूज पेपर मध्ये तसा काही दिसत नाही.
आजकालच्या न्यूज पेपर मध्ये मोठ्या प्रमाणात जाहिराती दिसून येतात. न्यूज पेपर मध्ये बातम्या किवा एखाद्या विषयाची माहिती कमी पण जाहिराती जास्त. आता मला एक गोस्त अजिबात समाजात नाही आहे कि आपण वाचावयास घेतलेले वृतपत्र हे नक्की वृतपत्र आहे कि जाहिरात पत्र. जर मग तुम्हाला न्यूज पेपर मध्ये जास्तीत जास्त जाहिराती देत असाल तर मग त्यासाठी तुम्ही वेगळा जाहिरात पत्र असे वृत्त सुरु का नाही करत. त्यातल्या त्यात राजकारणी लोकांचे पण खूप वाढदिवसाची माहिती दिलेली असते. मान्य आहे कि बहुतेजाशे पेपर हे राजकीय पक्षाचे आहेत. म्हणून काय त्यांचे फक्त वाढदिवस आणि जास्तीत जास्त जाहिरातीच द्याव्या. जर अशा प्रकारे तुम्ही न्यूज पेपर काढलात मग लोकांनी नक्की वाचव काय. हा मोठा प्रश्न लोकांसमोर उभा होतो.
No comments:
Post a Comment