Tuesday, 25 October 2016

प्रदूषण एक समस्यां

आपल्या आजू बाजूच्या परिसरात अनेक प्रकारे प्रदूषण घडत आहे आणि हे प्रदूषण मानवाकडूनच घडून येत आहे.काही माणसांना याची जाणीव आहे व काही माणसांना याची जाणीव देखील नाही आहे. जर आपण अशा प्रकारे प्रदूषण करत राहिलो तर एक दिवस हि मानवी जीवन सृष्टी धोक्यात येईल. कारण आपल्याकडून अनेक माध्यमातून प्रदूषण घडत आहे. आणि या प्रदूषणाला करणीभूत पण आपणच आहोत . आपल्याला प्रदूषण कमी करता आलं पाहिजे. आपल्याकडून नकळत प्रदूषण घडत असत. त्यामध्ये  ध्वनी प्रदूषण,हवा प्रदूषण,पाणी प्रदूषण. अशे अनेक प्रदूषण होत असतात.
 
हे प्रदूषण आपल्याला थांबवले पाहिजे. त्यासाठी आपल्याला कमीत कमी प्रदूषण कशा प्रकारे करता येतील विचार केला पाहिजे. त्यासाठी आपल्याला  हवा प्रदूषण कमी करण्यासाठी कमी धूर सोडणार्या गाड्या वापराव्या लागतील.चालत जाता येईल अशा ठिकाणी  गाडी नेवू नये . अशा ठिकाणी चालताच किंवा सायकल ने जाता आलं पाहिजे.त्यामुळे इंधन बचत पण होईल आणि हवा प्रदूषण पण होणार नाही. त्यानंतर दिवाळीत फटाके वाजवणे कमी केले पाहिजेत अथवा पूर्ण पणे बंद केले पाहिजेत त्यामुळे ध्वनी प्रदूषण पण होणार नाही आणि वायू प्रदूषण पण होणार नाही.त्यानंतर आपण जो कारखान्यातील सांडपाणी नदी किंवा समुद्रात सोडतो त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी प्रदूषण होते. नांतर तेच पाणी घरोघरी पोचते पिण्यासाठी आणि मग हेच पाणी पिऊन आपण आजारी पडतो . मग आपणच केल्याला कृत्याला आपणच बळी पडतो . आपण जर प्रत्येक गोष्टी कडे दुर्लक्ष केले तर मानवी जीवन धोक्यात येईल. म्हणून आपणच मानवी जीवन वाचवून सगळ्यांना आनंदी राहता आलं पाहिजे. 

No comments:

Post a Comment