आजकाल बॉलिवूड मधील कलाकार मोठ्या प्रमाणात करोडो रुपये कमावत आहेत. ते पण इन्कम टॅक्स न भरता हे पैसे कमावत आहेत. जर आपण एवढे करोडो पैसे बॉलिवूड वर खर्च करू शकतो. तर मग तेच पैसे आपण गरीबांनवर का खर्च करू शकत नाहीत. आपण हे पैसे अनेक प्रकारे लोकांच्या ,किंवा समाज कल्याणा साठी वापरू शकतो. ज्या महाराष्ट्रात मार्च एप्रिल च्या दरम्यान पाण्याचा दुष्काळ पडतो. त्याच महाराष्ट्रात नागराज मंजुळे सैराट सारखा चित्रपट काढून करोडो कमावून दुष्काळ ग्रस्त लोकांना तो मदत करू शकतो. मग बॉलिवूड मधील कलाकार पण करोडो मधेच कमावत आहेत. मग त्यांनी भारतात चित्रपट तयार करून करोडो कमावतात मग त्यांनी महाराष्ट्रातील लोकांना मदत केली तर कुठे वाया जातेय .
बॉलिवूड मधील किवा मराठी फिल्म इंडस्ट्रीतील लोकांनी जर मदत केली तर महाराष्ट्रातील अनेक प्रॉब्लेम दूर होतील. यांनी केलेल्या पैशाच्या मदतीतून आपण खूप चांगली काम करू शकतो. ज्या गावातील माणसे किंवा मुले-मुली शिक्षणापासून वंचित आहेत. किंवा त्यांना शिकण्याची इच्छा आहे पण शाळा -कॉलेज नसल्या मुले ते शिकू शकत नाही आहेत. अश्या लोकांसाठी आपण फिल्म इंडस्ट्रीतील कलाकारांनी दिलेल्या पैशातून आपण त्यांच्या साठी शाळा कॉलेज बंधू शकतो. त्यांना शिक्षणा साठी आर्थिक दृष्ट्या मदत करू शकतो .
त्याच प्रमाणे काही गावात प्राथमिक उपचारासाठी हॉस्पिटल नाही आहेत.त्यातूनच एखादा व्यक्ती आजारी पडला तर त्याला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी २०-३० कि.मी अंतर चालत जावे लागते. त्यातच त्या व्यक्तीची प्रकृती खूपच गंभीर असेल तर त्या व्यक्तीला दवाखान्यात घेऊन जाण्याआधीच मरण पावलेले असते. या गोष्टी होऊ नयेत म्हणून त्यांच्या साठी आपण त्यांच्या गावात प्राथमिक आरोग्य केंद्र बंधू शकतो . आपण जो वायफळ पैसा कुठेही करत असतो तोच पैसा समाज सेवे साठी वापरला तर कोणत्याही गावात कोणीही व्यक्ती मृतिमुखी पडणार नाही . आणि कोणी शिक्षणा पासून वंचित देखील राहणार नाही.
No comments:
Post a Comment